- माझा महाराष्ट्र – माहिती जिल्ह्यांची –
“बुलढाणा जिल्हा”
भाग 6 वा दि. 06 मे, 2025
=========================================================
संकलन आणि मांडणी
श्री.लक्ष्मण काटेकर, सोलापूर (महाराष्ट्र).
Contact @ 7588020886.
=========================================================
“बुलढाणा जिल्हा”
आपण बुलढाणाचा इतिहास पाहणार आहोत, बुलढाणा जिल्हा भारताच्या महाराष्ट्रातील अमरावती विभागात आहे. जिल्ह्याचे नाव बहुधा भिल थाना (भिल्ल, आदिवासी गट) पासून आले आहे. हे विदर्भ प्रदेशाच्या पश्चिम सीमेवर वसलेले आहे आणि राज्याची राजधानी मुंबईपासून 500 किमी दूर आहे.
जिल्ह्यात शेगाव, जळगाव जामोद, मलकापूर, खामगाव, लोणार, मेहकर, आणि चिखली अशी शहरे आणि शहरे आहेत. हे उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेला अकोला, वाशिम आणि अमरावती जिल्हे, दक्षिणेला जालना जिल्हा आणि पश्चिमेस जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यांनी वेढलेले आहे.
बुलढाणाचा इतिहास
बुलढाणा, बेरार प्रांताच्या उर्वरित भागांसह, विदर्भ राज्याचा एक भाग होता ज्याचा उल्लेख महाभारत, एक संस्कृत महाकाव्य आहे. अशोक (272-231 बीसीई) च्या काळात बेरारने मौर्य साम्राज्याचा एक भाग तयार केला.
बेरार सातवाहन राजवटी (इ.स.पूर्व दुसरे शतक – दुसरे शतक इ.स.), वाकाटक राजवंश (तिसरे ते सहावे शतक), चालुक्य राजवंश (सहावे ते आठवे शतक), राष्ट्रकूट राजवंश (to ते १० वे शतक) यांच्या अधिपत्याखाली आले. चालुक्य पुन्हा (10 वी ते 12 वी शतके), आणि शेवटी देवगिरीचे यादव राजवंश (12 व्या शतकाच्या उत्तरार्ध ते 14 व्या शतकाच्या सुरुवातीस).
14 व्या शतकाच्या सुरुवातीला दिल्लीचा सुलतान अलाउद्दीन खलजीने हा प्रदेश जिंकला तेव्हा मुस्लिम राजवटीचा काळ सुरू झाला. हा प्रदेश बहमनी सल्तनतचा भाग होता, जो 14 व्या शतकाच्या मध्यावर दिल्ली सल्तनतपासून तुटला.
15 व्या शतकाच्या अखेरीस बहमनी सल्तनत लहान सल्तनतींमध्ये विभागली गेली. 1572 मध्ये, बेरार अहमदनगर येथील निजाम शाही सल्तनतचा भाग बनला. निजाम शाहींनी 1595 मध्ये बेरारला मुघल साम्राज्याच्या ताब्यात दिले.
18 व्या शतकाच्या सुरुवातीला मुघल राजवट उलगडण्यास सुरुवात झाली, हैदराबादच्या निजाम असफ जाह I ने 1724 मध्ये साम्राज्याच्या दक्षिणेकडील प्रांतांवर कब्जा करून एक स्वतंत्र राज्य बनवले. बेरार हा स्वतंत्र राज्याचा एक भाग होता.
1853 मध्ये संपूर्ण जिल्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासनाखाली आला. बेरारचे पूर्व आणि पश्चिम बेरारमध्ये विभाजन करण्यात आले आणि बुलढाणा जिल्ह्याचा पश्चिम बेरारमध्ये समावेश करण्यात आला. 1903 मध्ये हैदराबादच्या निजामाने बेरारला भारत सरकारच्या ब्रिटिश सरकारला भाड्याने दिले होते.
अशा प्रकारे, बेरार मध्य प्रांतांचा भाग बनला. 1950 मध्ये, मध्य प्रदेशचा भाग बनला आणि नागपूर त्याची राजधानी होती. 1956 मध्ये, विदर्भातील इतर मराठी भाषिक प्रदेशांसह, हे 1960 मध्ये नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्राचा भाग बनले.
बुलढाणा जिल्हयातील तालुके –
या जिल्हयात एकुण 13 तालुके आहेत
- बुलढाणा
- चिखली
- देउळगांव राजा
- खामगांव
- शेगांव
- मलकापुर
- मोताळा
- नांदुरा
- मेहकर
- लोणार
- सिंदखेड राजा
- जळगांव जामोद
- संग्रामपुर
बुलढाणा जिल्हयापासुन काही प्रमुख शहरांचे अंतर –
बुलढाण्या पासुन औरंगाबाद 150 कि.मी, पुणे 425 कि.मी., अमरावती 200 कि.मी., नागपुर 350 कि.मी अंतरावर आहे. बुलढाणा जिल्हयाला धार्मिक आणि ऐतिहासीक आणि वैज्ञानिक असा त्रिवेणी संगमाचा वारसा लाभलेला आहे. प्रसिध्द असे श्री संतश्रेष्ठ गजानन महाराजांचे शेगाव याच जिल्हयात आहे, लाखोंच्या संख्येत भाविक नेहमी या तिर्थस्थानी येत असतात. छत्रपतीशिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ मासाहेबांचे माहेर याच जिल्हयातील सिंदखेड राजा आहे जिथे दरवर्षी जिजाउं जन्मोत्सव अत्यंत दिमाखात साजरा होत असतो. आणि वैज्ञानिक दृष्टीने देखील या जिल्हयाला अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त झाले आहे ते लोणार तालुक्यातील सरोवरामुळे. लोणार सरोवर हे खा.या पाण्याचे सरोवर असुन पृथ्वी वर उल्का पडल्यामुळे या सरोवराची निर्मीती झाली आहे. अश्या प्रकारचे हे एकमेव सरोवर असल्याचे देखील बोलल्या जाते. आणि म्हणुनच बुलढाणा जिल्हयाला धार्मीक, ऐतिहासीक आणि वैज्ञानिक महत्व असल्याचं बोलल्या जातं.
बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटन स्थळं –
बुलढाणा जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्वाचा मानला गेला आहे त्यातलीच ही काही महत्वाची पर्यटन स्थळं.
शेगाव – Gajanan Maharaj, Shegaon
शेगाव हे संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पावन पदस्पर्शाने अतिशय प्रसिध्द आणि धार्मीक स्थळ बनले आहे. शेगाव संस्थान आपल्या स्वच्छतेमुळे, शिस्तीमुळे देखील ओळखल्या जाते.
संस्थान ने अनेक समाजउपयोगी कार्य देखील केले आहे, आनंद सागर हा प्रकल्प शेकडो एकरात तयार झालेला अत्यंत सुरेख आणि रमणिय परिसर शेगाव संस्थानच्या दुरदृष्टीकोनाची साक्ष देतो.
अत्यंत माफक दरात आनंदसागरची सहल करता येत असल्याने अनेक शाळा आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सहलीकरता आणत असल्याचे दिसते. सुट्टीच्या दिवसांमधे आनंद सागर हा प्रकल्प गर्दीने फुलुन गेलेला पहायला मिळतो.
अंबा बरवा अभयारण्य –
हे अभयारण्य देखील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु आहे. अनेक वन्यजिवांचे इथे वास्तव्य असुन त्यामधे वाघ, चित्ता, सांबर, हरिण, चैसिंगा (चार शिंगाचे हरिण) आणि विविध पक्ष्यांचे हे निवासस्थान आहे. अभयारण्याला भेट देण्याचा चांगला काळ म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी आहे, पण जनावरांना पाहाण्याकरता एप्रील ते 15 जुन हा देखील चांगला काळ आहे. या व्यतीरीक्त बुलढाण्यापासुन 8 कि.मी. अंतरावर दिनगंगा अभयारण्य देखील पाहाण्यासारखे आहे. इथे देखील अनेक वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार आपल्या दृष्टीस पडु शकतो.
लोणार सरोवर – Lonar Crater Lake
पृथ्वीवर उल्का पडल्यामुळे तयार झालेले लोणार सरोवर पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु आहे. जगातल्या पाच मोठया सरोवरापैकी लोणार सरोवर हे एक आहे. खा.या पाण्याचे हे सरोवर जवळपास 52,000 वर्ष जुने असल्याचे देखील बोलल्या जाते. हे सरोवर संपुर्ण जंगलाने वेढले असल्याने वेगवेगळया पक्ष्यांचे निवासस्थान आहे. सरोवरानजीक गोमुख असुन यातुन 12 ही महिने अखंड धार पडत राहाते.
नांदु.याचा हनुमान
बुलढाणा जिल्हयातील नांदुरा इथं एक विशालकाय आकाराची हनुमंताची मुर्ती भाविकांना आकर्षित करणारी आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर ही मुर्ती स्थापली असुन या मुर्तीची उंची 105 फुट आहे. संपुर्ण जगात एवढी विशाल हनुमानाची ही एकमेव मुर्ती आहे. या मुर्तीला 30 फुटांचा आधार देण्यात आला आहे, शेपटी 70 फुट लांब असुन हात 25 फुटांचे आहेत. या महामार्गावरून ये जा करणारे या मुर्तीला पाहुन आश्चर्यचकीत होतात. लांबलांबुन पर्यटक या मुर्तीला पाहाण्यासाठी गर्दी करतात.
या व्यतीरिक्त देखील बरीचशी स्थानं बुलढाणा जिल्हयात असुन ती पे्रक्षणीय आणि भाविकांच्या गर्दीने कायम फुलली असतात. देवगांव चे बालाजी मंदीर, मेहकर चे बालाजी मंदीर, मेहकर चा कंचनीचा महाल, लोणारचे दत्त सुदान मंदीर, चिखलीचे रेणुका देवी मंदीर, सैलानी बाबा दर्गा, सिंदखेड येथील राजमाता जिजाउंचे जन्मस्थान, प्रल्हाद महाराजांचे साखरखेर्डा, कमळजा देवी मंदीर, खामगाव मधे जनुना तलाव, अमृत नगर, बोथा जंगल, वाघलीचे हनुमान मंदीर इत्यादी ठिकाणं पाहाण्यासारखी आहेत.
बुलढाणा जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या अमरावती विभागात आहे. विदर्भातील या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९६८० चौ.किमी इतके असून लोकसंख्या २२,३२,४८० इतकी आहे. जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण दिशेस अनुक्रमे अकोला–वाशीम,अमरावती जिल्हा, जळगाव–जालना व परभणी हे जिल्हे आहेत. तर उत्तरेस (मध्य प्रदेशचा)नेमाड जिल्हा आहे.[१]
शेगांव येथील आनंदसागर बागेचे प्रवेशद्वार
विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान
जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यालय बुलढाणा शहरात असून ते १३ तालुक्यांशी राज्य महामार्गानी जोडले गेले आहे. मुंबई ते हावडा हा महत्त्वाचा रेल्वेमार्ग तसेच पूर्व–पश्चिम भारतास जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ या जिल्ह्यातून गेला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडील सर्व नद्या पश्चिम दिशेस वाहणाऱ्या आहेत व त्या तापी नदीला जाऊन मिळतात तर दक्षिणेकडील नद्या पैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. कापूस, ज्वारी, सोयाबीन, सूर्यफूल ही या जिल्ह्यातील महत्त्वाची पिके आहेत. जिल्ह्यात खामगाव, मलकापूर ही औद्योगिक शहरे आहेत.
जिल्हयाविषयी काही विशेष माहिती – Buldhana District Information
- 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 2,586,258
- बुलढाणा जिल्हयाचे क्षेत्रफळ 9,640 कि.मी.
- साक्षरतेचे प्रमाण 82.09%
- प्रमुख राजमार्ग नॅशनल हायवे नं. 6
- मुख्य पिकांमधे कापुस, ज्वारी असुन त्याव्यतिरीक्त तिळ, सोयाबीन, सुर्यफुल, भुईमुग देखील या भागात घेतले जाते.
मंदिरे, धार्मिक स्थळे आणि पर्यटनस्थळे
-
- बुलढाणा जिल्हा संक्षिप्त माहिती:-
- शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांचे मंदिर आहे व आनंदसागर हा प्रसिद्ध बगीचा आहे.
- लोणार येथील उल्कापाताने निर्मिलेले खाऱ्या पाण्याचे सरोवर प्रसिद्ध आहे.
- जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे गांव छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे जन्मस्थान आहे.
- नांदुरा येथे जगातील सर्वात मोठी श्री हनुमान मूर्ती आहे.
- देऊळगाव राजा हे गाव तेथील भगवान बालाजीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. देऊळगाव राजास प्रति तिरुपती सुद्धा म्हटले जाते. जर कोणी एखादा नवस तिरुपती बालाजीला बोलला असेल मात्र तेथे जाऊन पूर्ण करू शकत नसेल तर तो देऊळगाव राजाच्या श्री बालाजी मंदिरात जाऊन पूर्ण करू शकतो.
- लोणारपासून दक्षिणेला १५ किमी अंतरावर (लोणार-आघाव-वझर रोडवर) पार्डा दराडे नावाचे गाव आहे. तेथे पांडवकालीन श्री महादेवाचे मंदिर आहे.
- लोणारपासून ७ किमीवर पांगरा (डोले) गाव आहे, तेथे भगवान बाबांचे मंदिर आहे.
- बुलडाणा जिल्ह्यातच पैनगंगा या नदीचा उगम झालेला आहे ते ठिकाण बुधनेश्वर हे असून बुलढाणा-अजिंठा या रोडवर बुलडाण्यापासून २० किमी अंतरावर आहे.
- बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये चिखलीपासून फक्त १२ किलोमीटरच्या अंतरावर साकेगाव या गावामध्ये जुने (हेमाडपंथी शिवमंदिर) आहे. साकेगाव हे निसर्गरम्य ठिकाण आहे.
- मोताळा तालुक्यातील तारापूर येथील अंबादेवीचे मंदिर हे जागृत देवस्थान आहे. हे राजा हरिश्चंद्र याने स्थापलेले असून नवरात्रोत्सव काळात येथे मोठी गर्दी असते.
- देऊळगाव राजा हे शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीतसुद्धा अग्रेसर आहे.
- सुलतानपूर येथील पुरातन वास्तू सिद्धेश्वर मंदिर शिल्पकलेचा उत्तम अविष्कार दर्शनीय आहे.
- उंद्री या गावापासून … कि मी अंतरावर वडाळी नावाच्या गावामध्ये प्रसिद्ध शिवमंदिर आहे.
- अमडापूर येथे प्रसिद्ध बल्लाळदेवी मंदिर आहे.
- मेहकर येथे आशिया खंडातील एकमेव पाषाणातील भाविकानचे श्रद्धास्थान शारंगधर बालाजी देवस्थान आहे.
- मेहकर पासून ५ किमी अंतरावर असणाऱ्या उकळी येथे जगदंबा माता देवस्थान , श्री सिद्धेश्वर संस्थान आहे
- लोणार पासून 18 कि मी अंतरावर श्री खटकेश्वर महाराज मंदिर ब्राम्हण चिकना या ठिकाणी आहे …
- बुलडाणा जिल्ह्यातील १८ किमी जवळच असलेल्या गिरडा या गावामध्ये प्रसिद्ध असलेल्या गजानन महाराज संस्थान द्वारा संचालित श्री स्वयंम प्रकाश महाराजांचे मंदिर आहे,तसेच गिरडा हे गाव निसर्ग पर्यटनाचे एक आकर्षण बिंदू आहे. येथील काळी भिंत ही पर्यटकांसाठी आकर्षक बाब आहे. निसर्गरम्य असलेल हे पर्यटन तसेच धार्मिक स्थळ बुलडाणा-अजिंठा राष्ट्रीय महामार्गावर आहे.
श्री क्षेत्र थळ ता.मोताळा श्री गजाननमहाराज जन्म स्थान प्रतिष्ठान
- हजरत बादशहा अब्दुल रहेमान शहा ऊर्फ सैलानी बाबाचा दर्गा हे पीरस्थान पिंपळगांव सैलानी येथे मुस्लिमांचे धार्मिक स्थळ ता.चिखली जिल्हा बुलढाणा येथे आहे. सैलानी बाबाच्या मार्च महिन्यातील ऐतिहासिक (ऊरुस) यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यांतून लाखोंच्या संख्येने हिंदू व मुस्लिम धर्मीय लोक उपस्थित राहतात. एका अंदाजानुसार सुमारे ३,००,००० च्यावर भाविक भक्त बुलढाणा जिल्ह्यातील हजरत बाबा सैलानी सरकार यात्रेला उपस्थित राहतात.
बुलढाणा शहरापासून जवळच 18 किमी दुर असलेले दुधा येथील प्रसिद्ध मर्डदी माता मंदिर आहे हे मंदिर जुन्या हेमाडपंथी पद्धतीचे आहे
बुलढाणा जिल्ह्यातील नद्या
उतवळी नदी, खडकपूर्णा नदी, नळगंगा नदी, निपाणी नदी, पूर्णा नदी, पैनगंगा नदी, बाणगंगा नदी, बोर्डी नदी, मन नदी, मास नदी, वाण नदी, विश्वगंगा नदी, ज्ञानगंगा नदी, आमना नदी
जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – बुलढाणा
- क्षेत्रफळ – 9,661 चौ. कि.मी.
- लोकसंख्या – 25,88,039 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
- तालुके – 13 – जळगांव जामोद, मलकापुर, बुलढाणा, खामगांव, नांदुरा, चिखली, मेहकर, शेगाव, देऊळगांवराजा, सिंदखेडराजा, संग्रामपुर, लोणार, मोताळा.
- सीमा – बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, दक्षिणेस परभणी व जालना हे दोन जिल्हे असून पूर्वेस अकोला जिल्हा आहे. पश्चिमेस औरंगाबाद व जळगाव हे दोन जिल्हे आहेत.
बुलढाणा जिल्हा विशेष –
- प्राचीन ‘कुंतल’ देशात हा प्रदेश समाविष्ट होता. सम्राट अशोकाच्या साम्राज्याच्या हा प्रदेश एक भाग होता. भिल्लांचे वस्तीस्थान म्हणजे ‘भिल्लठाणा’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन बुलढाणा हे नाव रूढ झाले.
- जिल्ह्याचे मुख्यालय असलेले बुलढाणा हे शहर वनश्रीने नटलेले व निसर्गरम्य स्थळ आहे. या शहराला विदर्भाचे प्रवेशव्दार म्हणून ओळखले जाते.
- हजारो वर्षापूर्वी उल्का पडल्यामुळे या जिल्ह्यात लोणार हे ठिकाण खार्या पाण्याच्या सरोवरासाठी जगभर प्रसिद्ध आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –
- बुलढाणा – हे शहर अजिंठ्याच्या डोंगर रांगात वसले असून थंड हवेचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे.
- खामगाव – येथे एक कुष्ठरोग निवारण केंद्र आहे. जवळच गारडगावाला प्रेक्षणीय बुद्ध विहार आहे.
- मलकापुर – येथील गौरीशंकर मंदिर विहार आहे.
- देऊळगाव राजा – देऊळगाव -राजा येथील बालाजी मंदीर प्रसिद्ध आहे.
- शेगांव – येथे गजानन महाराजांची समाधी आहे.
- सिंदखेड-राजा – छत्रपती शिवाजी महाराजाच्या मातोश्री जिजाई यांचे जन्मस्थान
- जामोद – जामोदचे प्राचीन जैन मंदीर प्रसिद्ध आहे.
- लोणार – उल्कापातामुळे तयार झालेला तलाव व त्या शेजारी यादवकालीन मंदीर प्रसिद्ध आहे. 18 व्या शतकात लोणार महात्म्यही लिहिले गेले त्यात लवणासुर या राक्षसाची कथा या महात्म्यात येते.
बुलढाणा जिल्हयाची वैशिष्ट्ये –
- राणीबाग वनोधान बुलढाणा जिल्ह्यात आहे.
- लोणार क्रेटर वनोधान बुलढाणा जिल्ह्यात आहे.
- बुलढाणा जिल्ह्यातून पेनगंगा, पूर्णा, पांडव, नळगंगा, बेंबळा, बाणगंगा, केदार, ज्ञानगंगा या नद्या वाहतात.
- बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख औधोगिक उत्पादने कापड, यंत्रमाग, भांडी, तेल काढणे, साखर, हत्यारे ही आहेत.
- बुलढाणा जिल्ह्यात नळगंगा नदीवर नळगंगा धरण आहे.
- बुलढाणा जिल्ह्यातून गेलेल्या लोहमार्गाची एकूण लांबी मुंबई-भुसावळ-हावडा (ब्रोंडगेज), जलंब-खामगांव (ब्रोंडगेज), 46 कि.मी.
माझा महाराष्ट्र अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सविस्तर इतिहास माहिती दररोज एक जिल्हा ह्या स्वरुपात आपणासमोर देत आहोत, तरी आपण त्या संदर्भाचा अभ्यासासाठी नक्कीच उपयोग करून घ्याल अशी प्रांजळ अपेक्षा !!!…..
अधिक माहितीसाठी सहज संपर्क – ७५८८०२०८८६
संकलन आणि मांडणी :-
श्री.लक्ष्मण काटेकर, सोलापूर (महाराष्ट्र).
shivnitee@gmail.com
Contact @ 7588020886.